नाशिक म्हाडा घोटाळा, प्रसंगी ‘ईडी’ कडे तपास देणार!
नाशिक म्हाडा घोटाळा, प्रसंगी ‘ईडी’ कडे तपास देणार!
नाशिक - नाशिकमधील म्हाडा गृहप्रकल्पात गरिबांच्या हक्काची घरे हडपण्याचे प्रकरण अत्यंत गंभीर असून, यात कितीही मोठा ‘मासा’ असला तरी त्याला सोडले जाणार नाही. गरिबांचे हक्क हिरावून घेणाऱ्या आणि त्यांचे रक्त पिणाऱ्या बिल्डरांना आम्ही सोडणार नाही, प्रसंगी या प्रकरणाचा तपास ‘ईडी’ कडे सोपवू,” असा सज्जड दम राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे दिला. नाशिक दौऱ्यावर असताना माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी म्हाडा घोटाळ्यावरून भूमाफियांना कडक इशारा दिला.
बावनकुळे म्हणाले की, “गरिबांसाठी असलेली २० टक्के घरे बळकावली गेली आहेत. एकाच दिवसात जमिनीचे तुकडे पाडणे, नोंदी घेणे आणि नकाशे मंजूर करणे ही मोठी रिंग आहे. या प्रकरणासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली असून यात एक आयपीएस आणि दोन आयएएस अधिकारी आहेत. १५ दिवसांत अहवाल येईल. लाचलुचपत विभाग आणि भूमी अभिलेख विभागातून या घोटाळ्याची सुरुवात झाली असून, नाशिक विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना याप्रकरणी कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. केवळ शिक्षा नाही, तर बिल्डरांकडून २० टक्के मालमत्ता रिकव्हर करून ती गरीबांना मिळवून देणार असेही ते म्हणाले.
• माझी जाणीवपूर्वक बदनामी, दावे दाखल करणार
मागील दोन दिवसांत समाजमाध्यमांवर असलेल्या काही व्हीडिओबाबत बावनकुळे म्हणाले की, मी एवढंच म्हटलं होतं की ज्यांच्या फार्महाऊस आहेत. फार्महाऊससाठी कर्ज घेतले आहे. ज्यांनी मर्सिडीज गाड्या घेतल्या आहेत त्या शेतकऱ्यांनी कर्जमाफी मागू नये. नार्मल गाडी शेतकरी घेतो, ट्रॅक्टर घेतो, चार चाकी वाहन घेतो याला कुणी म्हणणार नाही; पण कर्जमाफी मागताना धनदांडगे लोक आहेत. त्यांच्याकडे ऐपत आहे. तेवढेच जर पैसे आपण गरीब शेतकऱ्याला दिले तर शेतकऱ्यांच्या अधिक जास्त फायदा होऊ शकतो. गरीब शेतकर्याला कर्जमाफी मिळावी ही भावना होती. त्याचा आधार घेऊन अशा प्रकारचे खोटे व्हिडिओ तयार करणे आणि माझी समाजामध्ये प्रतिमा खराब करण्याचं काम सुरू आहे.
“माझ्याकडे ८० एकर शेती असल्याचे खोटे आरोप केले जात आहेत; प्रत्यक्षात माझ्याकडे २८ एकरच जमीन आहे. जाणीवपूर्वक बदनामी केली जात असून याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. संबंधितांविरोधात १० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे,” या शब्दांत आपली भूमिका बावनकुळे यांनी स्पष्ट केली.
• महसूल संदर्भातील पुरावे एस आय टी ला द्या
अशोक खरात प्रकरणात १२ गुन्हे दाखल झाले असून यामध्ये एसआयटी तपास करत असून कोणीही सुटणार नाही. महसूल विभागातील अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. ज्यांच्याकडे पुरावे असतील त्यांनी ते एसआयटीला द्यावेत असेही ते म्हणाले.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर