प्रशिक्षकपदावरून गौतम गंभीरला बीसीसीआयकडून मिळणार डच्चू? अखेर BCCI ने सोडलं मौन,
प्रशिक्षकपदावरून गौतम गंभीरला बीसीसीआयकडून मिळणार डच्चू? अखेर BCCI ने सोडलं मौन,
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याभोवती सुरू असलेल्या अटकळींवर आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने प्रतिक्रिया दिली आहे. बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी स्पष्ट केले की, गंभीर यांना प्रशिक्षकपदावरून हटवण्याच्या बातम्या पूर्णपणे निराधार आणि तथ्यहीन आहेत. अलीकडेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत पराभवानंतर, बीसीसीआयमधील एका अधिकाऱ्याने माजी भारतीय फलंदाज व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांच्याशी कसोटी संघाच्या प्रशिक्षकपदाबाबत चर्चा केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.
लक्ष्मण यांच्याशी चर्चा झाली होती का?
मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये गंभीर यांचा प्रशिक्षक म्हणून रेकॉर्ड चांगला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने एक आयसीसी आणि एक एसीसी ट्रॉफी जिंकली आहे. मात्र तगड्या देशांविरुद्ध 10 कसोटी सामने गमावल्यानंतर लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये गंभीर यांच्या प्रशिक्षक म्हणूनच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
वृत्तसंस्था पीटीआयच्या अहवालानुसार, बीसीसीआयमधील महत्त्वाच्या पदावर असलेल्या एका व्यक्तीने अनौपचारिकरीत्या व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांच्याशी संवाद साधून, ते लाल चेंडूच्या संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारण्यास इच्छुक आहेत का, याची चाचपणी केली होती. मात्र पुढे असे समोर आले की, लक्ष्मण सध्या बंगळुरू येथील ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’मध्ये हेड ऑफ क्रिकेट या पदावर समाधानी आहेत.
बीसीसीआयने भूमिका केली स्पष्ट
गंभीरबाबत आता सैकिया यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्यांनी वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना सांगितले, “ही बातमी पूर्णपणे चुकीची आहे. काही प्रतिष्ठित माध्यमांनीही ती पसरवली असली, तरी त्यात कोणतेही तथ्य नाही. बीसीसीआयने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. ही पूर्णपणे मनघडंत कथा आहे. यात कोणतीही सत्य नाही. ही बातमी तथ्यात्मकदृष्ट्या चुकीची आणि निराधार आहे, एवढेच मी स्पष्टपणे सांगू शकतो.”
2027 पर्यंत आहे गंभीर यांचा कार्यकाळ
गौतम गंभीर यांचा बीसीसीआयसह असलेला करार 2027 मधील एकदिवसीय विश्वचषकाच्या समाप्तीपर्यंत आहे. मात्र, बीसीसीआयच्या गोटात अद्यापही यावर चर्चा सुरू असल्याचा दावा करण्यात येत होता की, जागतिक कसोटी अजिंक्यपद (WTC) 2025–27 या चक्रातील उर्वरित नऊ कसोटी सामन्यांसाठी लाल चेंडूच्या संघाचे नेतृत्व करण्यास गंभीर योग्य आहेत की नाही.
भारताने इंग्लंडविरुद्धची पाच कसोटी सामन्यांची मालिका 2–2 अशी बरोबरीत संपवली होती. 2026 मध्ये भारतीय संघाला श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी सामने खेळायचे आहेत, तर ऑक्टोबरमध्ये न्यूझीलंडचा दौरा करायचा आहे. त्यानंतर जानेवारी–फेब्रुवारी 2027 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर पाच कसोटी सामन्यांची महत्त्वाची मालिका खेळली जाणार आहे. मात्र, सैकिया यांच्या वक्तव्यामुळे हे स्पष्ट झाले आहे की, गौतम गंभीर यांना प्रशिक्षक म्हणून बीसीसीआयचा पूर्ण पाठिंबा मिळत आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant