गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी विशेष टोलमाफी पास पर्यूषण पर्वात दोन दिवस कत्तलखाने राहणार बंद २९ टक्के कोसळला या गेमिंग कंपनीचा शेअर Asia Cup मध्ये भारत-पाक आमने सामने- सरकारने दिली परवानगी 12 आणि 28 टक्क्यांचा GST स्लॅब होणार रद्द, सर्वसामान्यांना फायदा अमेरिकेत छत्रपती शिवरायांच्या कीर्तीरथाची भव्यदिव्य मिरवणूक कानात ईअर फोन असल्याने युवकाचा मृत्यू पोस्ट झाले अत्याधुनिक – अ‍ॅडव्हान्स पोस्टल टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म सुरु BSNL ची मान्सून ऑफर – 1 महिना मोफत इंटरनेट गणेश विसर्जनाच्या पार्श्वभुमीवर सामाजिक सलोख्यासाठी हजरत महंमद पैगंबर जयंती ८ सप्टेंबर रोजी होणार .. आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर निवृत्त न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी विरोधी पक्षाचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार प्रवासाला तब्बल बारा तास, मग टोल का द्यावा, सर्वोच्च न्यायालयाचा सवाल उपमुख्यमंत्री शिंदेंनी जाहीर केले ‘लाडकी सून’ अभियान मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी… कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ… उच्च न्यायालयाचे कोल्हापूर सर्किट बेंच झाले सुरू मतदार यादीबाबतचे आरोप शपथपत्रासह करा अन्यथा माफी मागा… शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेचा निकाल १८ ऑगस्टला जालन्यात मुसळधार पावसाने नदी नाले तुडुंब… मुंबईत पागडीधारकांना आदित्य ठाकरेंकडून पुनर्वसनाची हमी कॅडबरी डेअरी मिल्कच्या रॅपरवर खास मराठीत शब्द पहिल्याच दिवशी FASTag वार्षिक पासला भरभरुन प्रतिसाद, १.४ लाखांहून अधिक नोंदणी राज्यात १६ ते २१ ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टीचा इशारा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्राचे उद्घाटन लवकरच ‘मुंबई विदिन ५९ मिनिट्स’ स्वप्न पूर्ण होणार डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौ.फुटांचे घर बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत सर्व घटकांना सोबत घेऊन विकास करणार ! नारळी पौर्णिमेला वरळीत हुल्लडबाजी करणाऱ्या उबाठा गटावर कारवाई करा BSF मध्ये 1121 जागांसाठी भरती; 10वी-12वी व ITI करु शकतात अर्ज 15 ऑगस्टपासून सुरू होणार FASTag Pass गणेशोत्सव काळात मुंबईत ‘डीजे’ला बंदी दादरमध्ये इमारतीच्या छतावर कबुतरखाना सुरू आधार कार्ड, व्होटर कार्ड,रेशन कार्ड हे नागरिकत्त्वाचे पुरावे नाहीत 15 ऑगस्ट रोजी कल्याण-डोंबिवलीत मांसाहार बंदी इथेनॉल पुरवठ्यात उ.प्रदेश पहिल्या तर महाराष्ट्र दुसर्‍या स्थानी हेपेटायटीस D पासून कर्करोगाचा धोका असल्याचा WHO चा निर्वाळा दहिहंडी सराव करताना 11 वर्षीय बालकाने गमावला जीव अमेरिकेच्या टॅरिफमुळे दोन अब्ज डॉलरची कोळंबी निर्यात धोक्यात सिंचन तलाव धोक्यात; भिंत खचली, २०० एकर शेतीला धोका…. हुतात्मा स्मारकाच ऐतिहासिक महत्त्व टिकले पाहिजे - आमदार सचिन अहिर रेल्वेकडून इतर प्रवाशांसह मुंबईकरांसाठी सुरक्षेच्या नव्या उपाययोजना राजकीय पक्षाचा चेहरा राहिलेली व्यक्ति न्यायालयाचा चेहरा असणे योग्य आहे का ? सरकारने लोकसभेत सादर केलेले आयकर विधेयक घेतले मागे अमेरिकेच्या टॅरिफचा भारतीय वस्त्रोद्योगाला मोठा फटका ठाणे जिल्ह्यातील या शहरात लवकरच सुरु होणार ‘पॉड टॅक्सी’ सेवा माथेरानची हातरिक्षा बंद करा – सर्वोच्च न्यायालयाचा आदेश कबुतरांना अन्न-पाणी देण्यावर उच्च न्यायालयाची बंदी कायम एक पडदा सिनेमागृहाबाबत संयुक्त समिती कोल्हापूरकर जिंकले, महादेवी हत्तीण पुन्हा येणार नांदणी मठात उत्तराखंडला गेलेले महाराष्ट्रातील सर्व पर्यटक सुखरूप ज्योतिर्लिंग विकास आराखड्यांच्या अंमलबजावणीसाठी सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती उत्तरकाशीमध्ये ढगफुटीमुळे हाहाकार, ४ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता भाजपाचे पदाधिकारी बनले न्यायाधीश, न्यायपालिकेचा निष्पक्षपणा धोक्यात? सेंचुरी मिलचा भूखंड कोणाच्या घशात घालणार? कामगार नेते गोविंदराव मोहिते‌ भायखळ्यात आमदार चषक 2025 ही भव्य हॉलीबॉल स्पर्धा संपन्न शिवसेना प्रभाग 205 च्या वतीने लाडू वाटप नृत्येश्वर संस्थेच्या विद्यार्थ्यांनी तैवानमध्ये भारतीय लोकनृत्यांची केली बहारदार सादरीकरण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो स्थानकाच्या नामकरणाविरोधात शिवसेनेचे आंदोलन एसटी आता करणार रिटेल (किरकोळ ) इंधन विक्री कबुतरांना खाद्य देणार्‍याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचा न्यायालयाचा आदेश काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा भाजपामध्ये प्रवेश ‘$1 ट्रिलियन’ अर्थव्यवस्थेकडे महाराष्ट्राची वेगवान वाटचाल! निवडणूक पारदर्शक होण्यासाठी मतदार यादी आधार क्रमांकाशी जोडा राज्यातील महापालिका रुग्णालयांमध्ये महिलांसाठी कर्करोग तपासणीची मोहीम हाती… स्वामीनाथन यांचा जन्मदिन “शाश्वत शेती दिन” म्हणून साजरा राज्य सरकारने जाहीर केले नवे सोशल मीडिया नियम राज ठाकरे आल्यानं कित्येक पटीनं आनंद- उद्धव ठाकरे खडसेंचा जावई पुण्यात रेव्ह पार्टीत रंगेहाथ पकडला गेला लाडकी बहीण योजनेसाठी 26.34 लाख महिला अपात्र जन्मतःच या बालकाच्या नावावर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड 10 उत्तीर्ण उमेदवारांसाठी IB मध्ये नोकरीची मोठी संधी शाळा, कॉलेज आणि कोचिंग संस्थांसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून 15 निर्देश जारी मुंबई रेल्वे साखळी स्फोट प्रकरण : हायकोर्टाच्या निकालाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती भारत आणि ब्रिटन यांच्यातील मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी ससून डॉकमधील मच्छीमारांच्या पुनर्वसनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल मुंबई के समुंदर में दुबे दुबे कर मारेंगे.. ; राज ठाकरे निशिकांत दुबेवर कडाडले सीमाभागातील निपाणी शहरात कन्नड भाषेची सक्ती महायुती सरकारला सत्तेचा माज -माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई महाराष्ट्राचीच , मुंबईत मराठी माणसाचाच आवाज बुलंद …. ‘जय गुजरात’ म्हणणारे एकनाथ शिंदे गुजरात व अमित शाहांचे गुलाम म्हाडा लॉटरीचा धडाका; ठाण्यात 2000 घरांसाठी सोडत, वाचा कधी येणार जाहिरात पावसाळ्यात केस का गळतात? अशी घरगुती उपाय करून थांबवा केस गळती NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

हि तर भकासाची नांदी...

संजयकुमार सुर्वे

देशात 2014 पासून विकासाचे वारे जोरात वाहत असून अधिकाधिक चटई निर्देशांक वाढवणे म्हणजे विकास हा समज सध्या सर्वच राजकीय पक्षांनी करून घेतला असून त्यातून ते कोणाचा विकास साधू पाहत आहेत हा प्रश्‍न मात्र अनुत्तरित आहे. हा विषय महाराष्ट्रात सध्या ऐरणीवर आला असून त्याला निमित्त आहे ते संपूर्ण महाराष्ट्रसाठी बनवलेली एकात्मक विकास नियंत्रण नियमावली. संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच विकास नियंत्रण नियमावली असावी अशी आमचीही भूमिका आहे. त्यामुळे विकासात सुसूत्रीपणा येऊन विकासाचा कायदा राज्यात सर्वाना समान राहील. पण त्यातही हि नियमावली मंजूर करताना सरकारने भेदभाव केल्याचे जाणवत आहे कारण यामधून मुंबई महानगरपालिकेला वगळले आहे. खरंतर मुंबई महापालिकेला सर्व प्रथम या नियमावलीत अंतर्भूत करणे गरजेचे होते. परंतु सर्वात जास्त विकास हा मुंबईच्या आवक मधूनच होत असल्याने कोणतेही सरकार मुंबईला हात लावू इच्छित नाही उलट विकासाच्या नावाखाली अनिर्बंध वाढीचा परवानाच मुंबईला राजकर्त्यांनी दिल्याचे पाहायला मिळत आहे. 

विकास कसा करावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे ब्रिटिशांनी मुंबईचा विकास करताना दाखवलेला दूरदृष्टीपणा. मुंबई शहर बसवताना त्यांनी सांडपाण्याच्या विल्हेवाटीपासून ते उद्याने, खेळाची मैदाने यांचे सूत्रबद्धतेने केलेले नियोजन जे 150 वर्ष नंतर आजही नागरिकांच्या उपयोगी पडत आहे. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी बनवलेली वैतरणा योजना आजही अव्याहतपणे मुंबईकरांची तहान भागवत आहे. पण स्वातंत्रानंतर आपल्या राजकर्त्यांनी बनवलेली विकासाची परिभाषा हि पूर्णतः भिन्न आहे. आजच्या राजकर्त्यांचा विकास म्हणजे टोलेजंग इमारती उभारणे आणि त्यातून स्वतः बरोबरच संबंधित विकासकाच विकास साधणे. पण हा विकास कोणाच्या सापेक्ष होत आहे त्यासाठी निसर्गाला आणि त्यानंतर समाजाला कोणती किंमत त्यासाठी मोजावी लागणार याचे सोयरसुतक ना प्रशासनाला आहे ना राजकार्त्यांना. त्यामुळे आज जो विकास विकास म्हणून आरडाओरडा केला जात आहे तो नक्की विकास आहे कि येणार्‍या पिढयांचे सामाजिक जीवन उध्वस्थ करणार्‍या भकासाची नांदी आहे याचे उत्तर काळच देणार आहे. 

मुंबईतील वाढत्या गर्दीचा लोंढा कमी व्हावा आणि तेथील लोकांना मोकळा श्‍वास घेता यावा म्हणून नवी मुंबई शहराची 70च्या दशकात निर्मिती केली. तसे पहिले तर या शहराचा विकास अद्याप पूर्ण झालेला नसतानाही या शहराची वाटचाल सध्या विकासाच्या नावाखाली भकासीकारणांकडे सुरु आहे. त्यात स्थानिक रहिवाशी, राजकर्ते, सिडको किंवा पालिका प्रशासन या सर्वघटकांचा हातभार आहे. सुरुवातीला अतिशय मोकळे रस्ते, मोकळी उद्याने आणि मैदाने म्हणून नावलौकिक मिळवलेल्या या शहराकडे नागरिक मोठ्या संख्येने आकर्षित झाले. त्याचबरोबर एमआयडीसीने ठाणे-बेलापूर हा औद्योगिक वसाहत पट्टा निर्माण केल्याने या शहराने लवकरच कात टाकली. रेल्वे वाहतूक सुरु झाली आणि नवी मुंबईने 1995 नंतर विकासाची धरलेली रफ्तार आजही अव्याहतपणे सुरु आहे. पण आता बिल्डरांच्या व स्थानिक नागरिकांच्या अधिकाधिक ओरबाडण्याच्या वृत्तीमुळे नवी मुंबईचे रूपांतरण नवीन धारावीत होणार नाहीना हि शंका उपस्थित होते त्याचे कारण म्हणजे पुनर्विकासाच्या नावाखाली देण्यात येणारे चटई क्षेत्र आणि त्यामुळे उभी राहणारी व्हर्टिकल झोपडपट्टी. 

40 वर्षांपूर्वी बांधलेली काही घरे आज मोडकळीस आली असून त्याची पुनर्बांधणी करणे आवश्यक आहे. पण हि पुनर्बांधणी कोणी करावी हा कळीचा मुद्दा आहे. या शहराची निर्मिती 1 चटई क्षेत्र समोर ठेवून सिडकोने केली असून काही भागातच 1.5 चटई क्षेत्र मंजूर केले आहे. त्या अनुषंगाने शहरात राहावयास येणार्‍या लोकसंख्येच्या प्रमाणात सार्वजनिक सोयीसुविधांची भूखंड, उद्याने, मोकळ्या जागा सोडल्या असून आजच या सुविधांची कमतरता नागरिकांना जाणवत आहे. सार्वजनिक दळणवळणाच्या साधनांची बोंबाबोंब असून उपलब्ध लोकसंख्येला ती अपुरी पडत आहेत. सध्या मोरबे धरणातून पाण्याचा पुरवठा नवी मुंबई महापालिका क्षेत्राला केला जात असून 18 लाख लोकसंख्येसाठी तो पुरेसा आहे. सध्या महापालिकेची लोकसंख्या 14 लाखांची असून वाढीव लोकसंख्येला नवीन पाणी पुरवठा साधणे उपलब्ध करून द्यावी लागणार आहेत. त्यातच पुनर्विकासाठी नवीन विकास नियंत्रण नियमावलीत 3.5 चटई क्षेत्र मंजूर केल्याचे विकासकांकडून सांगितले जात असल्याने भविष्यात नवी मुंबईकरांपुढे काय वाढून ठेवले आहे याची कल्पना न केलेली बरी. 

सध्या शहरात जमिनीचे भाव गगनाला भिडले असून नवीन इमारती बांधण्यासाठी  जागा नसल्याने आहे त्या इमारती मोडून तेथे नवी टोलेजंग इमारती बांधणे हाच एकमेव पर्याय विकासकांपुढे आहे. त्यामुळे ज्या इमारती डागडुजी करून राहण्यायोग्य करता येऊ शकतात त्या इमारतींना धोकादायक ठरवून पुनर्विकासाचा मार्ग चोखाळायचा गोरख धंदा सध्या विकासकांनी आरंभला आहे. त्याला स्थानिक राजकर्त्यांसोबत झारीतील सरकारी शुक्राचार्यांची साथ लाभत आहे. 15 वर्षांपूर्वी पालिकेने धोकादायक म्हणून जाहीर केलेल्या इमारती आजही दिमाखात उभ्या असून मग त्यांना धोकादायक कसे घोषित केले हा संशोधनाचा मुद्दा होईल. उद्या या चांगल्या इमारती विकासकांच्या हव्यासापायी धोकादायक ठरवून नष्ट करण्यात येणार असतील तर लाखो टन सिमेंट, लोखंड, वाळू, विटा आणि मनुष्य बळ वाया जाईल ते वेगळे पण पुन्हा या इमारतींना उभे करण्यासाठी निसर्गावर जो घाला घालावा लागेल त्याची किंमत कोण मोजणार. त्यामुळे निसर्ग व मानवी जीवनाच्या भकासाची नांदी ठरणार्‍या या विकासाला आधीच अटकाव करणे गरजेचे आहे. 

विकासाच्या नावाखाली निसर्गाकडून ओरबाडण्याचा ध्यास सध्या मानवाने घेतला आहे. लाखो हेक्टर जमिनीवरील जंगले विकासाच्या नावाखाली नष्ट केली जात आहेत. सरपणासाठी व गाड्यांच्या चलनवलनासाठी दररोज लाखो टन गॅस आणि तेल जमिनीच्या पोटातून काढून जाळले जात आहे आणि त्यातून निर्माण होणार्‍या उष्णतेने वातावरणातील तापमान तर वाढतच आहे शिवाय प्रदूषणामुळे मानवी जीवनाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. वाढणार्‍या उष्णतेने उत्तर आणि दक्षिण ध्रुवावरील बर्फ विरघळत असून समुद्राच्या पाण्याची उंची दिवसेंदिवस वाढत असून सखल भागातील लाखो हेक्टर जमीन नापीक झाली आहे. अनेक शहरे व बेटे या पाण्याखाली येऊन नष्ट होणार आहेत. मानवाच्या निसर्ग चक्रातील हस्तक्षेपामुळे जगाचे ऋतुमान चक्र बदलले असून अतिवृष्टी, पूर, अकाली वादळे आणि वाढते तापमान यासारख्या नैसर्गिक आपत्तींना तोंड देत आहे. हे सर्व सुरु आहे तो काही लोकांच्या चुकीच्या विकासाच्या कल्पनेमुळे. आवश्यक मानवी गरजा आणि त्यानुसार निसर्गाला साजेसा विकास याची सांगड वेळीच मानवाने घातली गेली नाही तर हि विकासाची पायवाट भविष्यातील मानवी जीवनाच्या भकासाची नांदीच ठरणार आहे. सृष्टीची उत्पत्ती आणि विनाश हा प्रत्येक युगात होतच आला आहे, पण मानवाच्या विकासाच्या हव्यासाने यावेळी तो लवकर होईल एवढेच.

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट